मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 916 वर गेली असल्याची माहिती समोर आली आहे. चिंतेत टाकणारी बाब म्हणजे आज राज्यात तब्बल 232 नवीन रुग्ण आढळून आले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

मात्र असे असले तरी आज 36 रुग्ण या आजारातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 295 वर पोहचली आहे.  

 

दरम्यान आज आढळून आलेल्या 232 नवीन रुग्णांमध्ये एकट्या मुंबईतील 183 रुग्ण आहे. आतापर्यंत मुंबईत 1 हजार 936 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 रुग्णांचा बळी या आजाराने घेतला आहे.  


https://mobile.twitter.com/ANI/status/1250436322763796492?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1250436322763796492&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F

Find out more: